औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची अंबादास दानवे यांच्या कडुन पाहणी पुणे जिल्ह्यातील ता.हवेली, लोणी काळभोर येथील पाटील वस्तीतील शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना याला जबाबदार असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात त्वरित कारवाई करून दंड आकारून कारवाईचे निर्देश विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.यावेळी जिल्हाप्रमुख माऊली कटके,तहसीलदार तृप्ती कोलते, सरपंच माधुरी काळभोर,तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर, रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर,जिल्हा महिला आघाडी संघटिका श्रद्धा कदम, तालुका प्रदेशाध्यक्ष छाया महाडिक, जिल्हा समनव्यक उर्मिला भुजबळ व स्थानिक गावकरी उपस्थित होते.