संगमेश्वर : देवरूख - कल्याण ही नव्याने सुरू करण्यात आलेली एसटी बस साखरपा येथून सोडण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन सरपंच विनायक गोवरे यांनी आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांना दिले आहे. डोंबिवली परिसरात राहणाऱ्या चाकरमान्याची ही विशेष मागणी आहे. साखरपा सरपंच विनायक गोवरे यांनी आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. लवकरच सदरची गाडी साखरपा येथून सोडण्यात येईल असे आश्वासन पाथरे यांनी दिले आहे. सरपंच विनायक गोवरे यांचे डोंबिवली परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांनी मागणी केल्याबद्दल विशेष आभार मानले आहेत.