औरंगाबाद : नाशिकमध्ये झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयास भेट दिली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान आग लागण्यामागे कारण काय? ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या संपूर्ण घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.आज शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागली. यात 11 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस काही क्षणात जळून खाक झाली. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સિહોર શહેરમાં આંદોલન કરવાના મુડમાં
છેલ્લા કેટલાય સમયથી ગુજરાતમાં વિવિધ પ્રશ્નોને લઈ આંદોલનોની વણઝાર જોવા મળી રહી છે ત્યારે બે વર્ષથી...
मथुरा : यमुना एक्सप्रेसवे पर सूटकेस में युवती की लाश मिलने से सनसनी, बेरहमी से की गई है हत्या
एक तरफ जहां श्रद्धा हत्याकांड को लेकर देशभर में उबाल है, वहीं दूसरी तरफ मथुरा से एक युवती की...
অভিযুক্ত ভিক্টৰ দাস আৰু জয়া কলিতাৰ বিষয়ে কি ক'লে লুৰিনজ্যোতি গগৈয়ে....
অভিযুক্ত ভিক্টৰ দাস আৰু জয়া কলিতাৰ বিষয়ে কি ক'লে লুৰিনজ্যোতি গগৈয়ে....
ખંભાતમાં મુખ્યમંત્રીના આગમન પૂર્વે વહેલી સવારે રોડ પર ડામરના "થીંગડા" માર્યા !
ખંભાતમાં ભલે વિકાસ થયેલો દેખાય કે ન દેખાય પરંતુ જ્યારે સરકારના કોઈપણ મંત્રી ખંભાતમાં આવવાના હોય...