हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.सदर मयत शेतकऱ्याचे नाव सिताराम गाडे वय वर्ष 47 असून त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे.तर दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शेतातील एका झाडाला आढळून आला असून तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आल्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.सदर शेतकऱ्याने घेतलेले पीक कर्ज व सततची नापीकी यामुळे कसे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.