औरंगाबाद : (दीपक परेराव)प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, मात्र आपल्याला एक पर्याय असतो. त्यामुळे सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र आहे, ते जपून हाताळावे. यातुन अनेक चांगले कामे करण्याची संधी आहे. त्यामुळे समाज माध्यमाद्वारे सकारात्मक कामे करा, असे आवाहन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडिया समन्वयकांची घेतली आढावा बैठकप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी संतोष बारसे, शिवसेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक गणेश वाघ, हर्षवर्धन त्रिभुवन, गौरव पाटील, श्रीकृष्ण पांचाळ, आकाश पोळ, अजय काळे, करण मरमठ, रोहित गांगवे, सागर बारवाल, अमोल पोटे, सचिन वल्ले पाटील, सोमेश राठोड, प्रवीण चंदन, राजेंद्र शेवाळे, राजू रोठे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, रोहित जैन, ऋषिकेश जैन, मोहन मुळे, नागेश थोरात, आदेश जाधव, अक्षय बांगर, प्रसाद पानपट, केतन हेकडे, कौतुभ गडकरी, नितीन सोन्ने, निलेश तरटे, अमोल गिरी आदींसह सोशल मीडिया सैनिक उपस्थित होते.