सुदैवाने जीवितहानी नाही

जिंतूर/प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील दत्त मंदिराच्या परिसरातील भगवान नामदेव आप्पा क्षीरसागर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.

मागील 8 दिवसात बोरी व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी भितीमध्ये मुरले. त्यामुळे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. घरातील आवरा आवर झाल्यामुळे घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. 

या घटनेमध्ये संसारोपयोगी साहित्य गहू, ज्वारी, कपडे, पलंग, डाळ, टी.व्ही., कपाट यांचे नुकसान झाले असून माळवद देखील कोसळले आहे. या घटनेमुळे क्षीरसागर कुटुंब उघड्यावर आले आहे. 

या घटनेमध्ये एकूण दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती घरमालकांनी दिली. याबाबत महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी क्षीरसागर कुटुंबियांनी केली आहे.