औरंगाबाद:- दि.१६स.(दीपक परेराव)आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या साठी औरंगाबादेत आले असता छत्रपती संभाजी नगर विमानतळावर मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद विमानतळावर भेट घेतली व त्यांना सध्या राज्यांमध्ये थैमान घातलेल्या लम्पी (LSDV) अजारा पासून जनावरांना वाचवण्यासाठी व शेतकरी बांधवांना या भयावह परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये एक विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची मागणी केली असता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी क्षणाचाही विलंब न करता ही मागणी मान्य केली व तात्काळ अमलात आणण्यासाठी मा.कृषिमंत्री व इतर शासकीय यंत्रणेला आदेशित केले.शेतकऱ्याविषयी व मुक्या जनावरांविषयी संवेदनशीलता दाखविल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विनोद पाटील यांनी मन:पूर्वक आभार मानले.