यवतमाळ : 'ग्रामहित' ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्स द्वारे आशिया खंडातील नामांकित  अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. हे सगळे असे स्टार्टअप आहेत की जे जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात. फोर्ब्स चे यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते.फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते.यंदा या निवड प्रक्रियेत ६५०कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. पंकज महल्ले,श्वेता ठाकरे ( महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे 'ग्रामहित '  चे संस्थापक संचालक असून कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते.शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात  अडकलेली आहे. पिककाढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात.स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देनेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.असे होऊ नये यासाठी २गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली.त्यातूनच' ग्रामहित ' चा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.फोर्ब्ज च्या यादीत समावेश झाल्याने आर्णी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.