हिंगोली जिल्ह्यात यावर्षी सतत दोन महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांची नासाडी झाली असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे तर हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात पुराच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असुन हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन आज मुंबईत हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.