बोहल्यावर चढण्यापूर्वी राष्ट्रगीत गायनासाठी सादलगाव (ता.शिरूर) येथे वधू सुद्धा दहा मिनिटे थांबली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभर राष्ट्रगीत सामूहिक गायनाचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, सादलगाव (ता. शिरूर) येथील वावगे कुटुंबातील वधू गौरी व दापोडी येथील जालिंदर खळदकर यांचे सुपुत्र आकाश यांचा विवाह बुधवारी (दि.१७) पार पडणार होता.

यावेळी वधू घरातून निघत असताना शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रगीत गायनासाठी थांबली व त्यानंतरच वधू पुढील कार्यासाठी मार्गस्थ झाली.