आमची प्रेरणा हरपली -आ.संदिप क्षीरसागर

जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या पातळीवर आपल्या समाजाचे आणि कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूराचे प्रश्न सातत्याने रस्त्यावर आणि विधीमंडळात मांडणारे माजी आ. विनायक मेटे साहेब यांचे आज सकाळी दुर्देवी अपघाती निधन झाल्याची बातमी कळाली, धक्काच बसला. विनायकराव आपल्या राजकीय जिवनामध्ये प्रकर्षाने समाजकारणाला अधिक महत्व द्यायचे. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यप्रणालीतून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळायची. ती प्रेरणा आज काळाने आमच्याकडून हिरावून घेतली. काल-परवा गोरक्षनाथ टेकडीवर त्यांची अन माझी झालेली भेट हि अखेरची ठरेल असे स्वप्नातही वाटत नव्हते. म्हणत आ. संदिप क्षीरसागरांनी भावना व्यक्त केल्या आणि विनायक मेटेंना श्रध्दांजली वाहिली.