वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

वैजापूर जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय वैजापूरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवा निमित्त तिरंगा ध्वजाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये वैजापूर शहरातील १३ शाळेतील ३००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम.मोईनोद्दिन एम ए, डी.एम. आहेर,तदर्थ जिल्हा व सत्र न्यायधीश पी.पी.मुळे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ न्यायधीश आर एम नेरलीकर, आर एम कराडे ,न्यायधीश आर एन ,प्रथम वर्ग न्यायधीश एस के खान ,न्यायधीश व्ही आर कुलकर्णी ,न्यायाधीश डी एम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

"भारत माता की जय"या जयघोषाने विद्यार्थ्यांनी वैजापूर शहरातून हाताशी तिरंगा ध्वज बाळगून आनंदोत्सव साजरा केला.या रॅली मध्ये न्यू हायस्कूल,नूतन कन्या,सेंट मोनिका,करूणा निकेतन,उर्दू हायस्कूल,मौलाना आझाद,आरोहण अकॅडमी,श्री स्वामी समर्थ विद्यालय,कन्या प्रशाला,राजमाता जिजाऊ हायस्कूल, या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवली.यावेळी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, गटविकास अधिकारी एच आर बोयनार,मुख्याधिकारी बी.यु. बिघोत,कृषी अधिकारी अशोक आढाव,महावितरणचे अविनाश जयंते, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, किरण नारखेडे, उपमुख्याधिकारी राहुल साठे, वकील संघाचे पदाधिकारी व विविध विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.