अक्कलकोट येथील  श्री स्वामी समर्थ  देवस्थान  संचलित  मुरलीधर  मंदिरात   गोकुळअष्टमी निमित्त सालाबादाप्रमाणे  कीर्तन महोत्सव व अखंड  नामविणा  साप्ताहाचे  आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन  महोत्सवात  जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र  गोंदीचे   ह. भ.प. श्रीपाद   महाराज मुळे   हे कीर्तन सेवेत  निरूपण  करतील  अशी माहिती मंदिर  समितीचे  चेअरमन महेश इंगळे  यांनी दिली. शुक्रवार   दिनांक 12 ते 18  अखेर   कीर्तन महोत्सव   व शुक्रवार  दिनांक 19 रोजी सकाळी   10 ते दुपारी  12 वाजता  अनेक भाविक  उपस्थितीत श्रीपाद महाराज  मुळे यांच्या  हस्ते दही हंडी फोडून  गल गोकुळ अष्टमी महोत्सवाची  सांगता  होईल. भाविकांना देवस्थानच्यावतीने भोजन  महाप्रसादाचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी  सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  महेश  इंगळे  यांनी केले आहे.