औरंगाबाद:- (दीपक परेराव) राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मंगळवारी आज दि. ९ ऑगस्ट रोजी मुहूर्त लागला. त्यात औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला अतुल सावे, संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रूपाने तीन कॅबिनेटी मंत्रिपदे मिळाली आहेत. आ. संजय शिरसाट यांना मात्र या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकली नाही. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणतीही नाराजी नसल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट झाले आहे

शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी ९ जणांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. फक्त तानाजी सावंत हे एक नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात नवीन आहे. इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. आज एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणतीही नाराजी नसल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आ. संजय शिरसाट आणि शहाजीबापू पाटील यांनी अशी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरितांना संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी 'व्यक्त केला.पहिली संधी राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन, नंदुरबारमधील भाजप नेते विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून पहिली शपथ ही ची ण ते. आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

सांगलीतील मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाचे पैठण मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे, रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत, उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी शपथ घेतली. त्यानंतर, डोंबिवलीमधील भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ शिंदे गटातील औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी शपथ घेतली. तर, शिंदे गटातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई यांनीही शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.