पावसाचे पाणी शिरले घरात;बालानगर येथील प्रकार

औरंगाबाद;पैठण तालुक्यातील बालानगर आज रात्रीच्या वेळी परिसरात सतत पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे गावातील रस्तालगत असणाऱ्या घरात पावसाचे पाणी शिरले असल्याची घटना रविवारी रात्री घडलीय.

बालानगर ग्रामपंचायत अंतर्गत मागील काही दिवसापुर्वी गावातील रस्त्याचे सिमिंट रस्ते तयार करण्यात आले मात्र ग्रामपचातच्या उदासीन भुमिकामूळे आज नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.येथील रस्त्याच्याकडेला असणारे कुठे साईट पंखे भरले नाही तर रस्ता हा उंच झाल्यामुळे आहे,तर गावातील नागरिकांचे सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत कडून करण्यात आलेली नाही.घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांची चांगली धांदल उडाली होती.

[छायाचित्रे-अफसर शेख,बालानगर]