हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गुरुवारी रात्री आठ वाजता झालेल्या अचानक अवकाळी पाऊस विजेच्या धक्क्याने आजेगाव येथील एका शेतकऱ्याचे झाडावर विज पडल्याने झाडाखाली बांधलेली बैलजोडी दगावली असुन शेतकऱ्यांचे एका लाखाचे नुकसान झाले आहे.