औरंगाबाद:-दि.२४ नो.(दीपक परेराव)कडा ऑफिस समोर जलवाहिनीची मोठ्या प्रमाणात गळती झाली असुन जलसंपदा कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या भागातील नागरिकांना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असुन ह्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे.या संदर्भात त्या ठिकाणी विधानसभा संघटक तथा मा.स्थायी समिती सभापती संभाजीनगर महानगरपालिका मा.श्री.रेणुकादास (राजु) भाऊ वैद्य साहेबांनी भेट देऊन मनपाचे अधिकारी श्री.रोमन मिस्कीन,श्री.अंकुश वाघ,जलसंपदाचे श्री.पाईकराव,शुभम चव्हाण,नितीन फूडवारकर,राम केकान,संदिप अहिरे,बंटी कचकुरे यांच्यासह भेट दिली व तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या असुन मनपा तर्फे उद्यापर्यंत ही गळती थांबविण्यात येईल असे मनपाचे अधिकारी श्री.मिस्कीन यांनी कळवले आहे.

जलसंपदा विभाग जवळ सेवन हिल ते गजानन मंदिर रोड मुख्य रस्ता येथील 300 मी.मी.व्यासाची जलवाहिनीची गळती बंद करण्यात आली यावेळी उपस्थित कनिष्ठ अभियंता श्री के.जे. मिस्किन ,श्री अंकुश वाघ, श्री सुशिल कुलकर्णी ,श्री गंगाधर होंदरणे , लाईनमन अमोल मते , रोडे, गुत्तेदार श्री सचिन आगरे यांच्या मार्फत अथक परिश्रमानंतर काम पूर्ण करण्यात आले.