औरंगाबाद:- दि.७ नोव्हे.(दीपक परेराव) श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गजानन नगर, येथे ह.भ.प.भागवताचार्य गीताताई महाराज चव्हाण ,आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून भक्तांना  दि.१ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या भागवत कथेचे श्रवण आज ७ नोव्हेंबर पर्यंत भक्त मय वातावरणात भक्तांनी सहभाग घेऊन भागवत कथा श्रवण केली. आणि आज शेवटच्या दिवशी ह.भ.प.नारायण महाराज चव्हाण,देवाची आळंदी यांच्या काल्याचे किर्तनाने समाप्ती करण्यात आली .त्यांच्या सुश्राव्य किर्तनाने भागवत कथा सप्ताहातील वातावरण आनंदी ,भक्तीमय वातावरणात परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला,मुले ,मुली भक्ती मय वातावरणात नाहून गेले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमावत परिवार व कार्यक्रमाचे संयोजक दिलीप आधुडे,ज्ञानेश्वर जातोडे, नामदेव राठोड,राजेंद्र पंडित,नितीन घुंगरड,श्री हरी नवले पाटील,नवनाथ पाटील,गणेश सरोवर,अर्जुन जमोदकर, राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेऊन सेवा केली.