संभाजी नगर :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी एडवोकेट आर यू हाणवते यांनी केली आहे या मागणीचे निवेदन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले आहे याप्रसंगी ऍडव्होकेट योगेश सुरडकर सामाजिक कार्यकर्ते कपिल वानखडे ज्ञान उर्जा भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रेम ठाकूर युवा सचिव संदेश सुभाष चव्हाण आदिची उपस्थिती होती