रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदचे विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मुश्ताक खान (माय कोकण), तर सचिव पदी मुझम्मील काझी (ग्रामीण वार्ता) यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, सचिव जमीर खलफे यांच्यासह सर्वांनी डिजिटल मीडिया परिषदच्या नवीन कार्यकरणीचे अभिनंदन केले आहे. 

नूतन जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान म्हणाले की, डिजिटल मीडिया सध्या झपाट्यानं वाढत जाणारं माध्यम आहे. देशभरातील जवळ जवळ सर्वच महत्वाच्या वृत्तपत्रांनी आपल्या डिजिटल आवृत्तीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर फेसबुक, इन्सटा, युट्यूबवर देखील लोकप्रिय झाले आहेत. शहरी भागाबरोबरच आता त्याचा विस्तार ग्रामीण भागातही वेगानं होत आहे. जिल्हा पातळीपासून गाव पातळीवर आज डिजिटल माध्यमं पोहोचली आहेत आणि उत्तम काम करत आहेत.

तसेच सुरुवातीला थोडासे दुर्लक्षित असलेलं हे माध्यम आता मध्यवर्ती ठिकाणी पोहोचले आहे. सर्वांच्या मदतीनं याला अधिक उंचीवर कसं नेता येईल, याची विश्वासहर्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर डिजिटल मध्यमात काम करणाऱ्यांना राज मान्यता मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. असे खान यावेळी म्हणाले.

यावेळी सचिव मुझम्मील काझी प्रतिक्रिया देताना म्हणाले, समाजाचा डिजिटल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हा दृष्टीकोन आपल्या कामातून बदलण्याची गरज आहे. जिल्हाभर डिजिटल मीडियाचे अनेक पत्रकार काम करत आहेत. त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या छताखाली आणून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील पत्रकारांना संघटित करून चांगले काम उभे करण्याची आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.