कन्नड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड , तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करावी म्हणून जनजागृती केली होती , मात्र तरीही ८ , ३३४ शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने ते लाभापासून वंचित राहणार आहेत . तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ४५४१७ शेतकरी पात्र ठरले होते . या सर्व शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून तसेच गावागावांत दवंडी देऊन प्रसार माध्यमातून बातम्या प्रकाशित करून तर सोशल मीडियावरुनसुद्धा करण्यात आले होते . यात ३७०८३ शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत प्रतिसाद देऊन आपले केवायसी पूर्ण करून घेतले . तालुक्यात अजूनही १८ टक्के म्हणजे ८३३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण न केल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना किसान सन्मान योजनेच्या लाभापासून चे 66 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतः आधार कार्ड घेऊन गावातील महा - ई सेवा केंद्र अथवा स्वतः मोबाईलवरून केवायसी करावयाचे आहे . यावेळी लाभार्थीना ओटीपी येतो . अजूनही ई - केवायसी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावे , कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही . - संजय वारकड , तहसीलदार , कन्नड वंचित राहावे लागणार आहे . सदर योजना अल्पभूधारक कमी उत्पन्न आसलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा केले जातात . पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अपूर्ण ई के वायसी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाने वेळोवेळी आवाहन करून ई के वायसी पूर्ण करण्याचे सूचित केले होते . त्यात काही शेतकऱ्यांनी अजूनही ते केले नाही . अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई - केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
माटुंदा गांव में चल रही भागवत कथा की जयकारों के साथ हुई पूर्णाहुति
जयकारों के साथ हुई भागवत कथा की पूर्णाहुति
बूंदी l ग्राम माटुंदा में श्री पुष्कर दास...
भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी उपलब्धि
उत्तर प्रदेश लखनऊ में,भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी उपलब्धि।सत्रों के मुताबिक उत्तर प्रदेश लखनऊ...
AAJTAK 2 LIVE | MUMBAI की थमी रफ्तार, आज के लिए RED ALERT, मुंबई की स्थिति को लेकर ताजा अपडेट | AT2
AAJTAK 2 LIVE | MUMBAI की थमी रफ्तार, आज के लिए RED ALERT, मुंबई की स्थिति को लेकर ताजा अपडेट | AT2
આમ.આદમી પાર્ટી દ્વારા વરવાળા ગામે જનસવાદ કાર્યક્રમ યોજાયો.
આમ.આદમી પાર્ટી દ્વારા વરવાળા ગામે જનસવાદ કાર્યક્રમ યોજાયો.
દિયોદર રેફરલ હોસ્પિટલ ખાતે હેડ નર્સ વય નિવૃત થતાં વિદાય સમારંભ યોજાયો...
દિયોદર રેફરલ હોસ્પિટલ ખાતે હેડ નર્સ વય નિવૃત થતાં વિદાય સમારંભ યોજાયો...