कन्नड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड , तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करावी म्हणून जनजागृती केली होती , मात्र तरीही ८ , ३३४ शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने ते लाभापासून वंचित राहणार आहेत . तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ४५४१७ शेतकरी पात्र ठरले होते . या सर्व शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून तसेच गावागावांत दवंडी देऊन प्रसार माध्यमातून बातम्या प्रकाशित करून तर सोशल मीडियावरुनसुद्धा करण्यात आले होते . यात ३७०८३ शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत प्रतिसाद देऊन आपले केवायसी पूर्ण करून घेतले . तालुक्यात अजूनही १८ टक्के म्हणजे ८३३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण न केल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना किसान सन्मान योजनेच्या लाभापासून चे 66 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतः आधार कार्ड घेऊन गावातील महा - ई सेवा केंद्र अथवा स्वतः मोबाईलवरून केवायसी करावयाचे आहे . यावेळी लाभार्थीना ओटीपी येतो . अजूनही ई - केवायसी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावे , कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही . - संजय वारकड , तहसीलदार , कन्नड वंचित राहावे लागणार आहे . सदर योजना अल्पभूधारक कमी उत्पन्न आसलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा केले जातात . पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अपूर्ण ई के वायसी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाने वेळोवेळी आवाहन करून ई के वायसी पूर्ण करण्याचे सूचित केले होते . त्यात काही शेतकऱ्यांनी अजूनही ते केले नाही . अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई - केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'BJP शासित राज्य पेपर लीक के एपिसेंटर बन चुके हैं-राहुल गांधी
NEET परीक्षा में धांधली को लेकर कांग्रेस लगातार केंद्र सरकार पर हमला बोल रही है. अब इस मुद्दे पर...
राष्ट्रीय पल्स पोलियो टीकाकरण अभियान दिवस जन चेतना रैली गरडदा व केवड़िया में निकाली।
Namana
रविवार 30 जून को आयोजित होने वाले राष्ट्रीय पल्स पोलियो टीकाकरण...
Vivo Y36 4G: 50MP कैमरा और 5,000mAh की बैटरी के साथ जल्द लॉन्च होगा वीवो का धांसू फोन, कीमत होगी बजट में फिट
Vivo Y36 4G India Launch Confirm Vivo Y36 को भारत में 20000 रुपये से कम में लॉन्च होने कि उम्मीद...