''अन्यथा रूमने हातात घेवुन शेतकरी सत्ताधारयांच्या मागे लागतील"

बीड (प्रतिनिधी)परतीच्या पावसाने शेतकरी राजाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असुन शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे परतीच्या पावसामुळे हातातोडांशी आलेला घास गेला आहे याचा विचार सत्ताधारी वर्गाने तात्काळ करावा व शेतकरी राजाला हेक्टरी एक लाख रूपये मदत जाहीर करावी अन्यथा रूमने हातात घेवुन शेतकरी राजा सत्ताधारयांच्या मागे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट नेते विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला आहे. परतीच्या पावसाने शेतकरयांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असुन हातातोडांशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने काढुन घेतला आहे प्रामुख्याने सोयाबीनचे पीक या परतीच्या पावसामुळे पुर्ण नष्ट झाले असुन शेतकरी राजा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे राज्य सरकारने या गंभीर बाबीची दखल घेवुन शेतकरी राजाला प्रति हेक्टरी एक लाख रूपये मदत तात्काळ जाहीर करावी शेतकरी राजाचा अंत पाहु नये अन्यथा शेतकरी राजा सत्ताधारयांच्या पाठीमागे रूमने घेवुन लागेल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट युवक नेते विवेक( बाबा)कुचेकर यांनी दिला आहे.