औरंगाबाद : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी उद्धवसेना , शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे . त्यात औरंगाबाद जिल्ह्यातून २० हजार लोक आणण्याचे उद्दिष्ट मातोश्रीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले आहे . एवढ्या लोकांना नेण्या - आणण्यासाठी किमान दोन कोटी रुपये आणि चार हजार चारचाकी लागणार आहेत . त्यासाठी धावपळ सुरू झाली आहे . शिंदे गटाने गर्दीसाठी मेळावे घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे . मात्र , किती लोक न्यायचे , याचे टार्गेट पुढील आठवड्यात निश्चित करण्याचे ठरवले आहे . उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की , एका चारचाकीत पाच जण गृहीत धरले तरी चार हजार गाड्या लागतील . प्रत्येक गाडीचा इंधन खर्च ५ हजार म्हणजे एकूणात २ कोटी रुपये लागतील . सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने चारचाकी जमवण्यासाठी सर्व शक्ती त्यासाठी पणाला लावण्यात आली आहे . दरम्यान , शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट , जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी गर्दीचा अंदाज घेण्यासाठी हिंदू गर्वगर्जना यात्रेच्या नावावर मेळावे सुरू केले आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
iQOO Neo 9 Pro की लॉन्चिंग डेट से हटा पर्दा, इस दिन लॉन्च हो रहा है नया Smartphone
iQOO अपने ग्राहकों के लिए iQOO 12 5G को लॉन्च कर चुका है। इस फोन के बाद कंपनी भारतीय बाजार के लिए...
સાવરકુંડલા ગોવર્ધનનાથજી ની હવેલીના હિંડોળા દર્શન
સાવરકુંડલા ગોવર્ધનનાથજી ની હવેલીના હિંડોળા દર્શન
G20 में PM Modi की इस तस्वीर ने India vs BHARAT की बहस क्यों तेज की? Anurag Thakur के बयान की चर्चा
G20 में PM Modi की इस तस्वीर ने India vs BHARAT की बहस क्यों तेज की? Anurag Thakur के बयान की चर्चा
सोलापूरचे सुपूत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान
सोलापूरचे सुपूत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान