जालना .कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेतीचे धडे देण्यात येतील या घोषणेवर सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, आपण हे वाक्य सकारात्मक दृष्टीने म्हणालो होतो. नोकरी नाही लागलीच तर विद्यार्थी चांगला शेतकरी व्हावा या हेतूने मी बोललो होतो. मात्र यामुळे काहींना पोटशूळ उठला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर ते बोलत होते. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्यात येऊन सुशोभीकरण केलं जाईल, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही देखील त्यांनी सांगितलं.राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम जमा झाली आहे. एनडीआरएफकडून जी मदत मिळते, त्यात बदल करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे. त्यामुळे हे बदल करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवू, अशी माहिती त्यांनी दिली. मागच्या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट होता की नाही हे अजित पवारांनाच माहीत असेल. दरम्यान तिजोरीत खडखडाट असता तर शेतकऱ्यांना मदत केली असती का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
India and Latin American countries should double trade to $100 bn by 2027: EAM
India’s top leaders have made 34 visits to the Latin America and the Caribbean region in...
घरात कोणी नसल्याचे पाहुन घरात घुसला चोरटा मग काय झाले ते पहा
घरात कोणी नसल्याचे पाहुन घरात घुसला चोरटा मग काय झाले ते पहा
25 सीटों वाले राजस्थान में भाजपा जीत रही 33 सीटें’, केजरीवाल के बयान से हर कोई हैरान
लोकसभा चुनाव के नतीजों से पहले एग्जिट पोल जारी हो चुके हैं। अब सभी को परिणाम का बेसब्री से इंतजार...
Ajit Pawar यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला दिला मदतीचा हात
Ajit Pawar यांनी अपघात ग्रस्त व्यक्तीला दिला मदतीचा हात