औरंगाबाद :-दि.१७ (दीपक परेराव)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरात मुक्कामी असताना सावरगांव घाट येथील भगवानबाबा भक्तीगड    दसरा मेळावा साठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तांच्या वाहनांना टोल माफी करावी करिता दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा करीता ऊसतोड कामगार तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपन्यातून लाखोचा जनसागर या भगवानबाबा भक्तीगडा वर या ठिकाणी येतो.

राष्ट्रीय महामार्ग क्र. २५५ चे वरून जावे लागते. यामध्ये २ ते ४ ठिकाणी टोल द्यावा लागतो. जो ऊसतोड कामगार यांना शक्य होत नाही. (आपण कोकण गणेश उत्सव, तसेच इतर उत्सव यांना एक दिवसाची माफी दिली होती. त्यामुळे आम्हाला ही एक दिवसाची टोल माफी देऊन सहकार्य करावे अश्या विनंतीचे या निवेदन देण्यात आले . 

यावेळी दसरा मेळावा समितीचे अध्यक्ष उध्दव ढाकणे व दसरा मेळावा कृती समितीचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते .