बहुजन मुक्ती पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढविणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष साळवे, साडेगांवकर यांनी दिली. 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील कार्यकर्ते व समविचारी संघटनांची व्यापक बैठक झाली. त्यातून हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले. या पार्टीतर्फे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार, महिला, कामगार, निराधार व्यक्तींच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्यात आला, असे नमूद करीत पार्टीतर्फे जिल्हास्तरावर जोरदार संघटन उभे करीत निवडणूक यशस्वीपणे लढविल्या जातील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.