यवतमाळ : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाचे बेमुदत धरणे आंदोलन मूबंई आझाद मैदानावर सूरू आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत  यांचे बरोबर  शिष्टमंडळाची चर्चा झाली व  मागण्या मान्य करायचे आश्वासन दिले.  परंतू आश्वासन देऊन दिशाभूल केली आहे. सविस्तर 18 मिनिट चर्चा केली व नेहमी महिला परीचरानंचे प्रस्ताव फेटाळून लावल्या जातोय. जो पर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सूरू राहणार आहे,अशी माहिती राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी दिली.