औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे  

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी औरंगाबादेत 13 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू आहे. कन्नड तालुक्यातील चापानेर येथील करण नामदेव पवार भरती दरम्यान गुरूवार, 18 रोजी रात्री 1.26 मिनिटांनी धावताना मैदानावर कोसळले. त्यांना लागलीच पुढील उपचारासाठी घाटीत दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप अप्राप्त असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.फिरासत यांनी सांगितले.