भाजप नेते खासदार डॉ अनिल बोन्डे यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या नंतर संसद भवन येथे पार पडलेल्या त्यांच्या पाहिल्याचं अधिवेशनात मध्ये तब्बल 23 प्रश्न उपस्थित करून अमरावती जिल्ह्यातील विविध समस्या कडे लक्ष वेधले.. यामध्ये मूल तत्वाने अमरावती विमानसेवा, आरोग्य विषयी प्रश्न, राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, अमरावती येथून नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या सारख्या विविध विषयाचे प्रश्न विचारत त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित करून सरकारने यांकडे लक्ष देण्याची मागणी राज्यसभा मध्ये केली आहे. यामध्ये राईट टू हेल्थ बिल 2021 बिलावरील चर्चेत सहभाग घेत आरोग्य विषयी सामान्य आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यायासाठी याचर्चेत सहभाग घेऊन केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्या कडे मागणी केली. तर अश्याअनेक ज्वलंत प्रश्न मांडून राज्यसभेत केंद्र सरकारचे खा. डॉ अनील बोन्डे यांनी लक्ष केंद्रित केले.