सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडांसह आदी नुकसान झाले असुन अनेक गरीब कुटुंबांची घरे उद्वस्थ होऊन कुटुंब बेघर झाली असल्याने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आहे.

                          महाराष्ट्रात अनेक ठिकणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गरीब कुटूंबाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र जनता दल ( सेक्युलर ) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या भरपाईची मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना देत महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाई झाली असेल तेथे सर्वांना मदत दिली जाईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.