माळशिरस तालुक्यातील नीरा नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना महसूल प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वीर धरणातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.

यामुळे नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा येत असून यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे त्याचबरोबर नीरा नदीमध्ये उतरू नये असा इशारा महसूल प्रशासन माळशिरस कडून नागरिकांना देण्यात आला आहे.